[ad_1]
अंतापूर, ता. सटाणा : तालुक्यातील दसाने, नरकोळ वनक्षेत्रात आग लागल्याच्या घटना ताज्या असतानाच आता पुन्हा श्रीपुरवडे येथील टिंगरी शिवारातील शेकडो एकरावरील वनक्षेत्रास अकस्मात आग लागली. त्यामुळे वन क्षेत्रासह वन्य प्राणी, पक्षी जळून खाक झाले. या बाबत तपास चालू आहे. त्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती ताहाराबाद वन परिमंडळ अधिकारी व्ही. आर. शिंदे यांनी दिली.
नाशिक- धुळे जिल्ह्याच्या सरहद्दीवरील टिंगरी शिवारातील बेळ्या, सोनकेल येथील राखीव जंगलास मोठ्या प्रमाणात आग लागली. त्यात सागवान, धामडा या झाडांचे क्षेत्र आहे. यासह बिबटे, हरिण, मोर त्यांची पिल्ले व इतर वन्य जिवांचा अधिवास आहे.
ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र सूर्यवंशी यांनी वनविभागाला घटनेची माहिती दिली. वनरक्षक हरुण सय्यद, पोलिस कर्मचारी, पोलिस पाटील रामचंद्र काबडी, वनमजूर राजेंद्र साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य सचिन हिरे, केवबा पवार, सुक्राम पगारे, सुक्राम ठाकरे आदींनी ग्रामस्थांसह आग विझविण्याचा प्रयत्न केला.
सूर्यवंशी म्हणाले,‘‘ वनक्षेत्राला लागलेली आग अत्यंत भयानक होती. त्या आगीत वन्य प्राणी, हरणे, मोर इतर लहान पक्षी व त्यांची पिल्ले सैरावैरा धावून जीव वाचवत होते. परंतु,मोठ्या प्रमाणात वृक्ष जळून खाक झाले. वन्यजीवांना जीव गमवावा लागला. संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली.
सततच्या आगीमुळे संताप
एकीकडे वनक्षेत्राचे संवर्धन करण्याची मोहीम राबविली जात आहे. दुसरीकडे आगीमुळे वनसंपदेचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे वन विभागाचे दुर्लक्ष यासाठी जबाबदार आहे, असा संताप नागरिक व्यक्त करीत आहेत.
अंतापूर, ता. सटाणा : तालुक्यातील दसाने, नरकोळ वनक्षेत्रात आग लागल्याच्या घटना ताज्या असतानाच आता पुन्हा श्रीपुरवडे येथील टिंगरी शिवारातील शेकडो एकरावरील वनक्षेत्रास अकस्मात आग लागली. त्यामुळे वन क्षेत्रासह वन्य प्राणी, पक्षी जळून खाक झाले. या बाबत तपास चालू आहे. त्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती ताहाराबाद वन परिमंडळ अधिकारी व्ही. आर. शिंदे यांनी दिली.
नाशिक- धुळे जिल्ह्याच्या सरहद्दीवरील टिंगरी शिवारातील बेळ्या, सोनकेल येथील राखीव जंगलास मोठ्या प्रमाणात आग लागली. त्यात सागवान, धामडा या झाडांचे क्षेत्र आहे. यासह बिबटे, हरिण, मोर त्यांची पिल्ले व इतर वन्य जिवांचा अधिवास आहे.
ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र सूर्यवंशी यांनी वनविभागाला घटनेची माहिती दिली. वनरक्षक हरुण सय्यद, पोलिस कर्मचारी, पोलिस पाटील रामचंद्र काबडी, वनमजूर राजेंद्र साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य सचिन हिरे, केवबा पवार, सुक्राम पगारे, सुक्राम ठाकरे आदींनी ग्रामस्थांसह आग विझविण्याचा प्रयत्न केला.
सूर्यवंशी म्हणाले,‘‘ वनक्षेत्राला लागलेली आग अत्यंत भयानक होती. त्या आगीत वन्य प्राणी, हरणे, मोर इतर लहान पक्षी व त्यांची पिल्ले सैरावैरा धावून जीव वाचवत होते. परंतु,मोठ्या प्रमाणात वृक्ष जळून खाक झाले. वन्यजीवांना जीव गमवावा लागला. संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली.
सततच्या आगीमुळे संताप
एकीकडे वनक्षेत्राचे संवर्धन करण्याची मोहीम राबविली जात आहे. दुसरीकडे आगीमुळे वनसंपदेचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे वन विभागाचे दुर्लक्ष यासाठी जबाबदार आहे, असा संताप नागरिक व्यक्त करीत आहेत.
[ad_2]
Source link