[ad_1]
पिकांच्या उन्हाळी (Summer Crop) लागवड क्षेत्रात यंदा ७.५ टक्क्यांनी वाढ झाली असून गेल्यावर्षीच्या ४४.२४ लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत यंदा २५ मार्च २०२२ पर्यंत देशात ४७.५७ लाख हेक्टर क्षेत्रात उन्हाळ पिकांची (Summer Crop) लागवड करण्यात आलीय. यातील ९.५४ लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या गेल्या आठवड्यात झाल्याचं सरकारी आकडेवारीवरून समोर आलंय.
यंदा कडधान्याच्या लागवडीचे क्षेत्र वाढलं आहे. गेल्या वर्षीच्या ५.२७ लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत यंदा ७.४८ लाख हेक्टर क्षेत्रात कडधान्य लागवड करण्यात आलीय. त्यातही मूग आणि उडीद लागवडीत प्रमाण वाढलंय. ओडीशातील कडधान्य लागवडीनं २.४६ लाख हेक्टरचा पल्ला गाठलाय, तर तामिळनाडूत १. ७६ लाख हेक्टरवर कडधान्य लागवड करण्यात आलीय.
हेही वाचा; गहू निर्यातीसाठी भारतानं कंबर कसली
उत्तर प्रदेशात (UP) (८६ हजार हेक्टर), पश्चिम बंगालमध्ये (७२ हजार हेक्टर), गुजरातमध्ये (४९ हजार हेक्टर), मध्य प्रदेशात (MP) (४२ हजार हेक्टर) , महाराष्ट्रात (१२ हजार हेक्टर), छत्तीसगडमध्ये (२६ हजार हेक्टर), बिहारमध्ये(Bihar) (१४ हजार हेक्टर), कर्नाटकात अवघ्या १० हजार हेक्टर क्षेत्रात कडधान्याची लागवड करण्यात आलीय. गेल्यावर्षीच्या ३. ६४ लाख हेक्टरच्या तुलनेत यंदा ४.८७ लाख हेक्टरवर मुगाची लागवड करण्यात आलीय. तर उडदाचे क्षेत्र गेल्यावर्षीच्या १. ३८ लाख हेक्टरवरून २. ३१ लाख हेक्टरांवर आलंय.
तेलबियांच्या लागवडीचं क्षेत्रही गेल्या वर्षीच्या ६.७७ लाख हेक्टरच्या तुलनेत वाढलं आहे. आकडेवारीनुसार ७.०८ लाख हेक्टर क्षेत्रात तेलबियांची (Oil Seeds) लागवड करण्यात आलीय.
पश्चिम बंगालमध्ये १. ७५ लाख हेक्टर क्षेत्रात, महाराष्ट्रात १. ०६ लाख हेक्टर क्षेत्रात, गुजरातमध्ये ९५ हजार हेक्टर क्षेत्रात तेलबियांची लागवड करण्यात आलीय. कर्नाटकात (९४ हजार हेक्टर), तेलंगणात (५२ हजार हेक्टर), ओडिशात (४३ हजार हेक्टर) गुजरातमध्ये (९५ हजार हेक्टर), उत्तर प्रदेशात (४० हजार हेक्टर), तामिळनाडूत (३३ हजार हेक्टर), छत्तीसगडमध्ये(Chhattisgarh (३० हजार हेक्टर क्षेत्रात तेलबियांची (Oil Seeds) लागवड करण्यात आलीय.
गेल्या वर्षीच्या २७.४७ लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत यंदा भातपिकाच्या लागवडीचं क्षेत्र किंचित घटलं असून २७.४४ लाख हेक्टर क्षेत्रावर भातपिकाची (Rice Crop) लागवड करण्यात आलीय.
पश्चिम बंगालमध्ये ९. २७ लाख हेक्टर क्षेत्रात भातपिकाची (Rice Crop) लागवड करण्यात आली असून तेलंगणात ६.७४ लाख हेक्टरवर, कर्नाटकात २. ९० लाख हेक्टर, ओडिशात २.०२ लाख हेक्टर, आसाममध्ये १. ९३ लाख हेक्टर क्षेत्रात भातपिकाची लागवड करण्यात आलीय.
व्हिडिओ पाहा;
तामिळनाडूत ८१ हजार हेक्टरवर, आंध्र प्रदेशात ७२ हजार हेक्टर क्षेत्रात, केरळमध्ये ५५ हजार हेक्टर क्षेत्रात , महाराष्ट्रात (Maharashtra) ३८ हजार हेक्टरवर, झारखंडमध्ये १४ हजार हेक्टर क्षेत्रात तर बिहारमध्ये(Bihar) केवळ ६ हजार हेक्टर क्षेत्रात भातपिकाची लागवड करण्यात आलीय. गेल्यावर्षीच्या ४. ३४ लाख हेक्टर क्षेत्रावरील भरडधान्य लागवडीच्या तुलनेत यावेळी ५. ५७ लाख हेक्टर क्षेत्रात भरडधान्य लागवड करण्यात आलीय.
[ad_2]
Source link